राघुच्यावाडीच्या मुलांनी पाठवली दिल्लीला पत्रे

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पत्रलेखन उपक्रम
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्ती जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” दि. १४ जानेवारी २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा संवर्धन व जतन व्हावे यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविले जातात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पत्रलेखन हा उपक्रम राबविण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अध्यक्ष, साहित्य अकादमी नवी दिल्ली यांना पत्रे लिहिण्यात आली. शाळेतील पाचवी ते आठवीतील ५० विद्यार्थ्यांनी पत्रलेखन केले. तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी पत्रे लिहिली.
विद्यार्थ्यांना पत्र लेखन कसे करावे हे समजले. पत्राचा प्रवास कसा होतो. पत्रावर पिन कोड कशासाठी टाकला जातो. याबद्दल माहिती मिळाली. पत्रलेखनाचा मुलांनी आनंद घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top