बालआनंद मेळावा

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांना जीवन व्यवहारातील कौशल्य अवगत व्हावी, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी शाळेत २१ डिसेंबर रोजी शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या बालआनंद मेळाव्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे,भाजीपाल्यांचे विविध स्टॉल लावले होते. पालकांनी, गावकऱ्यांनी या स्टॉलला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. 
विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांची, भाजीपाल्याची जवळपास 14 हजारांची विक्री केली. विक्री करत असताना विद्यार्थ्यांना हिशोबाचे ज्ञान मिळाले. नाणी व नोटा याबद्दल माहिती मिळाली. संवाद कौशल्य विकसित झाले.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांचा विकास होतो. त्यामुळे असे उपक्रम शाळांमध्ये घ्यायला हवेत.

बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन करताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक. 

गावकऱ्यांनी बालआनंद मेळाव्याला भेट देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आपल्या पाल्यांची कौतुक केले.

आपापल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणला होता. विद्यार्थी भाजीविक्रेते बनले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top