शंभुधन फुगलोंसा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
शंभुधन फुगलोंसा
—————————————
विद्यार्थी मित्रांनो,आपल्या देशातून इंग्रज सहजासहजी गेले नाहीत. त्यांनी भारतीय जनतेवर अन्याय केले.त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी कित्येक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.आज आपण आसाम राज्यातील अशाच एका क्रांतीकारकाची गोष्ट पाहणार आहोत. त्या क्रांतीकारकाचे नाव आहे शंभुधन फुगलोंसा.
शंभुधन फुगलोंसा हे एक आसामी क्रांतीकारक होते. त्यांचा जन्म आसाम राज्यातल्या माईब-लकेर गावात सन १८५० साली झाला.
शंभुधन फुगलोंसा हे लहानपणापासूनच इंग्रज 
अधिकाऱ्याचा उन्मत्तपणा व अत्याचार पाहत आलेले होते.हा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. त्यांच्या मनात इंग्रजाबद्दल चिढ निर्माण झाली होती.या देशातून इंग्रजांना हाकालून द्यावे असे त्यांना वाटायचे.शंभुधन यांनी तरूण वयातच युद्धशास्त्राचे शिक्षण घेतले होते. त्यांनी समविचारी तरूण मित्रांच्या सहाय्याने तरूणांचे संघटन बनविले. शंभुधनांनी त्या सर्वांनाही सैनिकी शिक्षण दिले होते. इंग्रज अत्याचाराच्या विरोधात शस्त्राने प्रतिकार करण्याची मानसिकता त्यांचात ठासून भरली होती. त्यामुळे ठिकठिकाणी इंग्रजाविरोधात संघर्ष सुरू झाले होते.
इंग्रज सरकार शंभुधन फुगलोंसांना पकडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांनी आपल्या कचार जातीच्या आदिवासी सहकाऱ्यांच्या सहाय्याने इंग्रजांशी छापामार युद्ध सुरू ठेवले होते. ते भूमीगत राहून इंग्रजाविरोधात जनतेला चेतवित होते. मेजर वायडने शंभूधनना एका खेड्यात गाठले. शंभूधन आणि मेजर वायड यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. शंभुधनने मेजर वायडचा खातमा केला. 
इंग्रज अधिकाऱ्यांनी कूटनीतीचा अवलंब करून शंभुधनांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण एका गद्दाराने इंग्रजांना शंभुधनाचा ठावठिकाणा दिला. मोठी सेना घेवून इंग्रज अधिकारी मेजर विल्यमने शंभुधनला घेरले. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात शंभुधनजी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार वेळेवर न झाल्याने त्यांची शारिरीक स्थिती अधिकच बिघडली. शेवटी १२ जानेवारी, इ.स. १८८३ रोजी शंभुधन फुंगलोसा यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top