जीवन शिक्षण कार्यशाळा

🌈✏ लेखन कार्यशाळा✏
विभागीय जीवन शिक्षण लेखन कार्यशाळा लातुर येथे 29 जानेवारी ते 31जानेवारी या कालावधीत संपन्न झाली.
कांदबरीकार प्रा.शेषेराव मोहीते,पत्रकार विकास गाढवे,कवि भारत सातपुते,कथाकार विलास सिंदगीकर,व्यंगचित्रकार प्रकाश घादगिने,इतिहास संशोधक विवेक सौताडकर या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.कार्यशाळेत कवि भारत सातपुते यांनी बाप या विषयावर कविता लेखन करून घेतले.
या कार्यशाळेत मी तीन लेख लिहले.
1)लेखन कार्यशाळेतील माझे अनुभव
2) पुस्तक परीक्षण: आनंदवन
3) एक वेगळा उपक्रम:  पोस्टकार्ड लेखन
तांबडे सर,गणेश गोरे,प्रशांत वान्नरे या मित्रांनीही सक्रीय सहभाग घेतला….तांबडे सर खुप चांगले लेखन करतात…आता आपल्या तालुक्यातील शिक्षकांनी लिहायला हवं….आपण राबवत असलेले उपक्रमांना प्रसिद्धी द्यायला हवी…त्यासाठी जीवनशिक्षणला लेख लिहावेत..
  याचबरोबर शिक्षण सहसंचालक डाँ.शंकुतला काळे,साहित्यीक उत्तम कांबळे,साहित्यीक ना.म.जोशी यांच्या मार्गदर्शनाच्या डी.व्ही.डी. दाखवण्यात आल्या……
खुप नवे मित्र मिळाले….आजपर्यत पुस्तकात वाचलेल्यांशी संवाद साधता आला…मी खुप चर्चा केली….
Sent from Samsung Mobile

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top