वेगळी वाट…

मला वाटते की शाळेत टाचण वही ऐवजी शिक्षकांची दैनंदिनी असावी.त्यात शिक्षकांनी दिवभरात काय काय घेतले.ते यावे.ती दिवसभरानंतर लिहावी.
वार्षिक नियोजन सुद्धा लवचिक असावे.आज टाचणाचा उपयोग शिक्षकांना कितपत होतोय?हा संशोधनाचा मुद्दा होईल.
ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभव देताना वर्गातील आंतरक्रिया काय असेल याची कल्पना करून टाचण लिहणं म्हणजे दिव्यच..( नाहीतरी ते लिहायला जागा असते तरी कुठे? )
खरं तर शिक्षक हा चालतं बोलतं पाठ्यपुस्तक असतो.अनेक छोट्या छोट्या संवादातून,प्रसंगातून मुलांच्या कौशल्याचा,क्षमतेचा विकास घडत असतो.यातुन जीवनकौशल्य,गाभाभूत घटक,मुल्ये याची शिकवण मुलांना आपसुकच घडत असते.हे सर्व टाचणात येतेय कुठे? यावर छान उपाय म्हणून प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम यांनी केलेल्या नोंदी खुप महत्त्वाच्या आहेत.
शिक्षकांची सृजनता,नवतेपणा,उपक्रशीलता टाचणात बसवणे अवघडच आहे. टाचण काढत काढत दैनंदिनीही लिहू या…….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top